२१ हजार किलो खिचडीचे वाटप
मिसाळ प्रतिष्ठानच्यावतीने
२१ हजार किलो खिचडीचे वाटपपण
पुणे – प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथे सतीश मिसाळ प्रतिष्ठानच्या वतीने २१ हजार किलो साबुदाणा खिचडीचे वाटप भाविकांना आषाढी एकादशीच्या निमित्ताने करण्यात आले.
गेली १८ वर्षे विठ्ठलवाडी येथे आषाढी एकादशीला खिचडी वाटपाचा उपक्रम प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात येतो, अशी माहिती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा, आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उपक्रमाला भेट दिली. दीपक मिसाळ, करण मिसाळ, मनोज देशपांडे, अजय डहाळे, दिलीप मिसाळ यांनी संयोजन केले.