इंटरनेट दिवस साजरा


जिल्हाधिकारी कार्यालयात सुरक्षित इंटरनेट दिवस साजरा

पुणे दि. 11 : आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन व्यवहार, सोशल मिडिया , ई-मेल व क्लाउड या सेवांच्या वाढत्या वापराबरोबरच सायबर गुन्ह्यांचा धोका देखील वाढला आहे. त्यामुळे प्रत्येकाने इंटरनेट सुरक्षेबद्दल जागरूक राहून उपाययोजना करणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सायबर गुन्हेगार निरनिराळे मार्ग शोधात आहेत. फिशिंग , डाटा चोरी, बँकिंग फ्रौड , सोशल मिडिया अकाऊंट हॅकींग, सायबर बुलीयिंग, सेक्सॉर्टेशन यासारख्या घटनांमध्ये वाढ झाली असून याबाबत सामान्य नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी केले.

फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी सायबर सुरक्षेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी सुरक्षित इंटरनेट दिवस (Safer Internet Day) साजरा केला जातो. आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र ( NIC ), पुणे यांच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

NIC च्या वतीने जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी, श्रीमती अश्विनी करमरकर आपल्या मनोगतात म्हणाल्या भारत सरकार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सायबर सुरक्षेसाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. सायबर क्राईम रिपोर्टींग पोर्टल ( www.cybercrime.gov.in), इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) आणि स्टे सेफ ऑनलाईन ( www.staysafeonline.in) यांसारख्या उपक्रमांद्वारे नागरिकांना मदत केली जाते. सायबर गुन्हे हे आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून लोकांना आर्थिक व मानसिक त्रास देण्याचे साधन बनले आहेत. त्यामुळे सुरक्षित इंटरनेट वापरासाठी प्रत्येकाने योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. शासन व कायदा अंमलबजावणी यंत्रणेसोबतच सामान्य नागरिकांनीही सतर्क राहून ह्या गुन्ह्यांना आळा घालावा असे त्यांनी सांगितले.

Advertisement

या कार्यशाळेस, विविध शाखांचे उपजिल्हाधिकारी , तहसीलदार व कर्मचारी उपस्थित होते.

0000
[११/२, १८:४१] +91 98217 14696: *निधी वितरणाबाबत संभ्रम न बाळगण्याचे महाज्योतीचे विद्यार्थ्यांना आवाहन*

पुणे, दि. ११ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने २५ जुलै २०२४ च्या शासन निर्णयान्वये शासनाने पात्र विद्यार्थ्यांना ५०% दराने अधिछात्रवृत्ती देण्यास मान्यता प्रदान केलेली होती.

तदनंतर इतर मागास बहुजन कल्याण विभागाने पीएच.डी. अधिछात्रवृत्ती-२०२३ मधील पात्र संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून १०० टक्के दराने सरसकट अधिछात्रवृत्ती मंजुर करण्यास सुधारित मान्यता देण्यात आलेली आहे. या निर्णयानुसार पात्र संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून १०० टक्के दराने सरसकट अधिछात्रवृत्ती अदा करण्याकरिता अंदाजित एकूण १२६.१४ कोटी निधी लागणार आहे.

ही बाब नव्याने उद्भवलेली असल्याने व मंजूर कृती आराखड्याच्या बाहेरील असल्याने या निधीची मागणी ही महाज्योती कार्यालयाने पूरक मागणीद्वारे शासनाकडे केलेली आहे. हा निधी उपलब्ध झाल्यानंतर याबाबत नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.

तसेच योजनेकरिता शासनाने पात्र ठरवलेल्या म्हणजेच २५ जुलै २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीतील रक्कम अदा करण्याबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. या अनुषंगाने संशोधन प्रगती अहवाल मागविण्यात आलेले असून अहवाल प्राप्त होताच तपासून अधिछात्रवृत्तीची रक्कम अदा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे, तरी निधी वितरणाबाबत विद्यार्थ्यांनी संभ्रम बाळगू नये, असे आवाहन महाज्योतीचे प्रकल्प संचालक कुणाल शिरसाठे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
00000


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!